Product Summery
Author: Kevin Missal
paperback
₹ 225
₹ 250
सूड. क्रोध. धार्मिकता. तीन व्यक्ती, नशिबाने एकमेकांशी बांधल्या गेलेल्या, पण प्रभावांमुळे विभक्त झालेल्या. कोण टिकून राहणार? आपल्या आयुष्यात नरसिंहाला इतका राग कधीच आला नव्हता. हिरण्यकश्यपच्या मृत्यूनंतर आता तो काश्यपुरीवर राज्य करत आहे आणि सूड घेण्याची योजना आखण्यातच आपला वेळ घालवत आहे. चेनचेनच्या मृत्यूमागे असलेल्या इंद्रदेवाला मारण्याची त्याने शपथ घेतली आहे. नरसिंहाचा क्रोध जास्तच वाढत असल्याचं जेव्हा प्रल्हादाच्या लक्षात येतं तेव्हा, नरसिंहाने आणखी काही निरपराध लोकांचा जीव घेण्यापूर्वी आणि सर्वत्र अराजकता माजण्यापूर्वी त्याला थांबवायला हवं हे प्रल्हादला जाणवतं. परंतु जे आवश्यक आहे, ते तो करू शकेल? स्वतःला अंधारात न गमवता तो आपल्या एकमेव पित्यासमान व्यक्तीला मारू शकेल? केविन मिसाल यांच्या सर्वाधिक खपाच्या नरसिंह पुस्तकत्रयीच्या या अंतिम पुस्तकात भगवान नरसिंह आणि प्रल्हादच्या हृदयस्पर्शी, प्रेरणादायी आणि थरारक गोष्टीची सांगता होते.